
फलटण : छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष होते. त्यांचा आदर्श ठेवूनच शासन काम करीत आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे नेहमीच प्रेरणास्त्रोत राहिले आहेत. त्यांचा आदर्श घेऊनच महाराष्ट्र राज्य अधिक प्रगतशील करण्याचे शासनाचे धोरण असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सातारा येथील पोवई नाका येथील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख आदींची उपस्थिती होती.
आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यास शासनाने सुरुवात केली आहे असे निदर्शनास आणून देत छत्रपती शिवाजी महाराज हे सदोदितपणे सर्वांसाठी प्रेरणास्तोत्र असल्याचे मंत्री देसाई यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

