भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज १५ मार्चपर्यंत भरण्यास मुदतवाढ

फलटण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे १५ मार्चपर्यंत भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
सदर योजना https://hmas.mahait.org या पोर्टलवर ऑनलाईन करण्यात आलेली आहे. या योजनेचे अर्ज ऑनलाईन पोर्टलद्वारे १५ मार्चपर्यंत भरण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे. यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांनी बँक तपशिल तात्काळ भरण्याची कार्यवाही करावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरलेला आहे परंतू अर्ज व त्यासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रती अद्यापपर्यंत सादर केलेल्या नाहीत, अशा विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रे सहायक आयुक्त, समाज कल्याण, सातारा कार्यालयात किंवा तालुक्याचे मुलां/मुलींचे शासकीय वसतिगृहात सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव यांनी केले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!